
नेहमीच आपल्या बिनधास्त शैलीत बोलणारे आणि वर्मावर घाव घालणारे वक्ते म्हणून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ओळखले जाते. अलिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी इच्छुकांची गर्दी किती वाढली आहे. त्याबद्दल नितीन गडकरी यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या मिश्कीलशैलीत वक्तव्य केले आहे. आजकाल पक्षांची आर्थिक स्थिती चांगली आहे. परंतू आम्ही अनेक लोकांकडून चहा – चिवडा खाल्ला आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्यालाच तिकीट मिळावे; मात्र आता जनता तितकीच हुशार झालेली आहे असेही ते म्हणाले.

