देशराजनीति

Sanjay Raut : त्यांना काय फडणवीसांनी अभय दिलं का ? संजय राऊत भडकले, नेमकं काय घडलं ?

महाड निवडणुकीतील राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तरी त्याला अद्याप अटक नाही. यावरून संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मंत्र्यांच्या मुलांवर कारवाई का नाही, त्यांना अभय दिले का, यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राऊतांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना राडा झाला आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. हे प्रकरण चंगलंच तापलं आहे. विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजप सरकार यांच्यावर टीकेची तोफ डागली डागली आहे. कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल विचारत राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. भाजपसोबत असलेल्या आघाडीतील लोकं हे भाजपचा पराभव करण्यास इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष हे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं. ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजप चालवतंय ते पाहिलं आहे का, गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधले एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही असं राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!